२००६ ते २००७ या काळात आमच्या विद्या मंदिर सोनवडे शाळेत कार्यरत असलेले मगदुम सर ,एक समर्पित, प्रेमळ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व.आमच्या सोनवडे शाळेत सरांचा कार्यकाळ फक्त एक दीड वर्षाचाच.सरांच्या काळात शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचे ठिकाण नसून एक संस्काराची कार्यशाळा असायची.प्रत्येक उपक्रमामध्ये सरांचा विचार आणि त्यांची जिद्द स्पष्ट दिसायची.मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असो, सामाजिक उपक्रम असो किंवा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण जागवण्याचे प्रयत्न सर नेहमी पुढे असायचे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जबाबदारी आणि सामाजिक भान यांचा संगम अनुभवला."शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देणे नव्हे, तर आदर्श नागरिक घडवणे आहे,"हे सरांनी कृतीतून दाखवून दिले होते. याच सरांच्या काळात आम्ही कधी नव्हे ती उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. विज्ञान प्रदर्शनात डझनभर ट्रॉफ्या जिंकून संपूर्ण गावभर जल्लोषात विजयाची मिरवणूक काढली होती.त्यांच्या प्रेरणेमुळेच त्या काळात मला शाळेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळण्याचा सन्मान लाभला होता जो माझ्यासाठी आजही अमूल्य आठवण आहे.आजही सरांचा आवाज, त्यांचा प्रसन्न चेहरा आणि त्यांची शिकवण आमच्या मनात जिवंत आहे.
आणि आज जेव्हा समजले की मगदुम सरांची पिशवी केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी निवड झाली आहे, तेव्हा मन अभिमानाने भरून आलं..ही निवड म्हणजे त्यांच्या अथक परिश्रमांना, निष्ठेला आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाला मिळालेला योग्य सन्मान आहे.अशा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकलो ही आमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी रुजलेले संस्कार ही आमच्यासाठी आयुष्यभर जपावी अशी शिदोरी आहे.
🙏 हार्दिक अभिनंदन मगदुम सर!
आपली शिकवण काळाच्या प्रवाहातही अमर राहो हीच आमची मनापासून प्रार्थना. 🌺
© अक्षय पांडुरंग पाटील, सोनवडे
Mob.No.9881424551

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा