वनीकरणाची दिखाऊ धामधूम की खरी जबाबदारी?"



           पावसाळ्याचे आगमन होताच आपल्याला सर्वत्र दिसू लागतात ते म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा असे फलक, बॅनर आणि जाहिराती. एकूणच वातावरणात अचानक 'हरित क्रांती'चा उत्साह निर्माण होतो. सोशल मीडियावर फोटो अपलोड होतात – हातात फावडे, गच्चीवर हसू आणि नव्या लागवडीचे झाड. पण खरोखर यामागची भावना खरी आहे का?  

संपूर्ण वर्षभर झाडांकडे दुर्लक्ष करणारे, झाडांच्या सावलीखाली उभी गाडी लावणारे, झाडे तोडून सिमेंटचे जंगल उभारणारेच पावसाळ्यात पुढे सरसावतात. 'झाडे लावा' म्हणणारे काही अधिकारी तर झाडांचे खरे नावसुद्धा सांगू शकत नाहीत. अनेक वेळा या कार्यक्रमांचे आयोजन केवळ छायाचित्रांपुरते मर्यादित राहते. लागवड होते, पण देखभाल नाही. पुढील काही आठवड्यांतच ती रोपे वाळून मरतात.

वनीकरण हे एकदिवसीय कार्यक्रम नसून सातत्याने, जबाबदारीने करण्याचा विषय आहे. झाड लावणे हे फक्त फोटोसाठी नव्हे, तर पर्यावरण रक्षणासाठी असले पाहिजे. एक झाड वाढवायचं असेल, तर त्याला प्रेम, काळजी आणि सततचा संपर्क हवा असतो – अगदी एखाद्या लेकरासारखं.

आपल्या गावात, शहरात, प्रत्येक नागरिकाने एक झाड लावण्याइतपतच नव्हे तर त्याच्या वाढीची जबाबदारी घेण्याची गरज आहे. झाड हे 'ड्युटी' नाही, ती आपली 'कर्तव्य भावना' असली पाहिजे.

यंदाच्या पावसाळ्यात एकच संकल्प करू –

"फोटोपुरती नाही, जबाबदारीने वनीकरण करू!"

© अक्षय पाटील, सोनवडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा