आजकाल कुठलाही उद्घाटनाचा कार्यक्रम असो, मग तो गावातल्या शाळेच्या वर्गाचा असो, पाण्याच्या टाकीचा, किंवा एखाद्या छोट्याशा वस्तीवरील रस्त्याचा एक गोष्ट हमखास दिसते.रिबीन कापायला नेता हवाच! ज्यांच्या हातात खुर्च्या आहेत, ज्यांचं नाव फलकावर छापता येतं, त्यांनाच मान दिला जातो. पण ज्यांच्या हातात खरंच घाम लागला, ज्यांनी स्वप्न पाहिलं, प्रयत्न केले ,म्हणजेच आई-वडील, शिक्षक, स्थानिक कार्यकर्ते त्यांचं योगदान कुठेतरी झाकोळलं जातं.
कधी कधी वाटतं, रिबीन कापणं हेच काय आपण सन्मानाचं मोजमाप मानतो का? खरं तर उद्घाटनाची रीत अशी असावी की, ज्यांनी खरं काम केलंय, ज्यांनी स्वप्न बघितलं, त्यांनाच तो सन्मान मिळावा.
राजकारणाच्या चमकदार फ्लॅशलाईटमध्ये, आईबापांसारख्या सावलीत उभ्या राहणाऱ्या लोकांचं स्थान पुन्हा मिळायला हवं.
© 2025 अक्षय पांडुरंग पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि. 9 जुलै 2025

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा