पुरे झाले आता...या अन्यायाच्या रणांगणात आज मला माझ्या लेखणीला तलवारीची धार द्यायची आहे.गप्प बसणं आता शक्य नाही कारण बाकीची पिलावळ आता वळवळ करत सुटली आहे.या अन्यायाच्या रणांगणात मला लेखणीतून आवाज उठवायचा आहे आणि जो जो आमच्या मराठा समाजाच्या हक्कांच्या आड येईल, विरोध करेल, त्याची फक्त शब्दांनीचं आर-पार चिरफाड करायची आहे.
आम्हाला डोकं टेकवायला लावायचं स्वप्न पाहणाऱ्यांनो,कान उघडे ठेवा.मराठा कधीच झुकणार नाही! आमचा इतिहास ज्वालामुखीसारखा ज्वलंत असा आहे आणि आम्ही त्याचं ज्वालेतून जन्मलोय.आमचा संघर्ष आमच्या अभिमानासाठी ,स्वाभिमानासाठी आहे आणि जाणून बुजून जर कोण चुकीचं करत असेल,आमच्या लढ्याला बदनाम करत असेल,आमच्या अभिमानाला, स्वाभिमानाला डाग लावत असेल तर त्याची माय या लेखणीच्या प्रत्येक अक्षरात असेल हे लक्षात ठेवा.आमच्या हक्कांवर डाका घालणाऱ्यांची झोप आम्ही लेखणीच्या धारदार शब्दांनी उडवून टाकू.
आम्ही शांततेत होतो,म्हणून तुम्ही उधळत आहात,पण आता आमची लेखणी पेटली आहे,शब्द लाल बुंद अंगार झाले आहेत आणि हा लेखणीचा विद्रोह थांबणार नाही जोपर्यंत मराठ्यांचा विजय होत नाही!.
आज माझे शब्द केवळ लेखन करणार नाहीत तर आता लढणारही आहेत.🚩🚩
✍🏻 - अक्षय पाटील
"माझ्या लेखणीतून...."
हे गणेशा, विघ्नहर्ता, गौरीपुत्रा!
हे गणेशा, विघ्नहर्ता, गौरीपुत्रा!
दोन दिवसांपूर्वी तुझं आमच्या घरात आगमन झालं. तुला आम्ही प्रथम पूजतो, कारण तू साऱ्यांचा विघ्नहर्ता आहेस. जग तुझी ओळख करते विघ्नं हरवणारा म्हणून, पण आज मराठ्यांच्या मार्गातलं हे सर्वात मोठं विघ्न , अन्यायाचं, दगडासारख्या सत्ताधाऱ्यांच्या हृदयाचं , अजूनही तसंच आहे!
आज मराठा समाज मुंबईच्या दारात उभा आहे. संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो जीव आपल्या हक्कासाठी झगडत आहेत.न्यायासाठी पेटलेला हा महासागर, ही केवळ जमलेली माणसं नाहीत हे मराठ्यांच्या पराक्रमाची जिद्द, कित्येक वर्षाचा संयम याची साक्ष आहे! कितीतरी मोर्चे निघाले, कितीतरी अश्रू गळाले, आणि कितीतरी लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. घराघरात शोक आहे, आईंच्या कुशीतून लेकरं निघून गेली… तरीही सत्ताधाऱ्यांच्या मनात हलकाही बदल नाही!
मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमची लढाई न्यायासाठी आहे, अन्यायाच्या विरोधात आहे! कितीतरी आई बहिणी रडल्या, कित्येक घरं उध्वस्त झाली, तरुण लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. अजून किती किंमत मोजायची मराठ्यांनी ?
हे गणेशा,आम्ही तुझ्यासमोर साकडं घालतो. तू जगाचा विघ्नहर्ता आहेस, आज मराठ्यांच्या वाटेत आलेलं विघ्न दूर कर! झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना बुध्दी दे, त्यांच्या मेंदूत न्यायाचा प्रकाश टाक, कारण हक्क मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.
हे विघ्नहर्त्या, मराठ्यांच्या वाट्याला आलेलं हे सर्वात मोठं विघ्न दूर कर. न्यायाचा दिवा पेटू दे, आरक्षणाचा हक्क आम्हाला मिळू दे, जेणेकरून कोणत्याही आईच्या कुशीतून पुन्हा अश्रू गळू नयेत, कोणत्याही बापाच्या खांद्यावरून पुन्हा त्याच्या लेकराची प्रेत यात्रा निघू नये!
हे गणेशा, आमचं साकडं एकच , मराठ्यांचा विजय निश्चित कर! अन्याय संपव, न्याय दे, आणि मराठा समाजाच्या अश्रूंना हास्याचं रूप दे!आमचं स्वाभिमानाचं सूर्य पुन्हा उगवू दे!
हे गणेशा, तुझ्या आशीर्वादाशिवाय ही लढाई अपुरी राहील पण तुझ्या कृपेनं विजय निश्चित आहे!
दोन दिवसांपूर्वी तुझं आमच्या घरात आगमन झालं. तुला आम्ही प्रथम पूजतो, कारण तू साऱ्यांचा विघ्नहर्ता आहेस. जग तुझी ओळख करते विघ्नं हरवणारा म्हणून, पण आज मराठ्यांच्या मार्गातलं हे सर्वात मोठं विघ्न , अन्यायाचं, दगडासारख्या सत्ताधाऱ्यांच्या हृदयाचं , अजूनही तसंच आहे!
आज मराठा समाज मुंबईच्या दारात उभा आहे. संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो जीव आपल्या हक्कासाठी झगडत आहेत.न्यायासाठी पेटलेला हा महासागर, ही केवळ जमलेली माणसं नाहीत हे मराठ्यांच्या पराक्रमाची जिद्द, कित्येक वर्षाचा संयम याची साक्ष आहे! कितीतरी मोर्चे निघाले, कितीतरी अश्रू गळाले, आणि कितीतरी लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. घराघरात शोक आहे, आईंच्या कुशीतून लेकरं निघून गेली… तरीही सत्ताधाऱ्यांच्या मनात हलकाही बदल नाही!
मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमची लढाई न्यायासाठी आहे, अन्यायाच्या विरोधात आहे! कितीतरी आई बहिणी रडल्या, कित्येक घरं उध्वस्त झाली, तरुण लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. अजून किती किंमत मोजायची मराठ्यांनी ?
हे गणेशा,आम्ही तुझ्यासमोर साकडं घालतो. तू जगाचा विघ्नहर्ता आहेस, आज मराठ्यांच्या वाटेत आलेलं विघ्न दूर कर! झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना बुध्दी दे, त्यांच्या मेंदूत न्यायाचा प्रकाश टाक, कारण हक्क मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.
हे विघ्नहर्त्या, मराठ्यांच्या वाट्याला आलेलं हे सर्वात मोठं विघ्न दूर कर. न्यायाचा दिवा पेटू दे, आरक्षणाचा हक्क आम्हाला मिळू दे, जेणेकरून कोणत्याही आईच्या कुशीतून पुन्हा अश्रू गळू नयेत, कोणत्याही बापाच्या खांद्यावरून पुन्हा त्याच्या लेकराची प्रेत यात्रा निघू नये!
हे गणेशा, आमचं साकडं एकच , मराठ्यांचा विजय निश्चित कर! अन्याय संपव, न्याय दे, आणि मराठा समाजाच्या अश्रूंना हास्याचं रूप दे!आमचं स्वाभिमानाचं सूर्य पुन्हा उगवू दे!
हे गणेशा, तुझ्या आशीर्वादाशिवाय ही लढाई अपुरी राहील पण तुझ्या कृपेनं विजय निश्चित आहे!
© अक्षय पाटील , सोनवडे ता:शाहूवाडी, जि: कोल्हापूर
ब्लॉग: akshaypatil1800.blogspot.com
ग्रामपंचायत निवडणूक
गावागावांत सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल लागलेली आहे. आपल्या गावात यंदा सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे, त्यामुळे स्पष्टपणे जाणवतं की आता स्पर्धा जास्त तीव्र होणार आहे. परंतु या स्पर्धेचं स्वरूप काय असावं, यावर थोडं चिंतन करणं आज गरजेचं आहे.
आज अनेक ठिकाणी राजकारण म्हणजे फक्त प्रतिष्ठेचा प्रश्न बनून बसलेला आहे. "माझा माणूस सरपंच झाला पाहिजे", "आपलं वर्चस्व टिकलं पाहिजे", "दोन दिवस गावभर बॅनर लावून नाव चमकवलं पाहिजे" एवढ्यावरच मर्यादित राजकीय आकांक्षा आहेत. हे पाहता, सरपंच पदाचा वापर विकासासाठी झाला पाहिजे की केवळ आत्मप्रौढीसाठी, हा प्रश्न अधिकच टोकदार होतो.अनेकदा गावात रस्ते असोत, पाणीपुरवठा असो, गटारी असोत किंवा गावकुस सुधारणा या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी निवडणूक म्हणजे फक्त मांडव, पोस्टर, जेवणावळी, आणि जातीय समीकरणं याच्यातच सारी शक्ती खर्च होते.
ज्यांना आपण ‘माझी माणसं’ म्हणून निवडून देतो, त्यांपैकी कितीजणांना खरंच ग्रामपंचायत कायद्याचं, निधी वितरणाचं किंवा ग्रामसभेचं स्वरूप माहिती असतं?
एका संशोधनानुसार, सुमारे ८० टक्के सरपंचांना ग्रामपंचायतीची मूलभूत माहितीही नसते. मग असे लोक गावाचा विकास नेमका कसा करणार?
सरपंच पदावर बसणं म्हणजे 'मी किती मोठा आहे' हे दाखवण्याची जागा नाही, तर 'गावात काय मोठं करायचं आहे' याचा विचार करण्याची जागा आहे.
ही संधी आहे:
१.नव्या पिढीला योग्य सुविधा मिळवून देण्याची.
२.पारदर्शक कारभार रुजवण्याची.
३.शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोचवण्याची.
४.गावात समाजिक सलोखा प्रस्थापित करण्याची.
यासाठी ज्यांना आपण उमेदवारी देतो, त्यांनी केवळ ‘सर्वसामान्य महिला’ म्हणून नव्हे, तर सुशिक्षित, समजूतदार, स्वप्न बाळगणाऱ्या महिला म्हणून समोर यावं, हीच खरी अपेक्षा.
गावचा कारभार हा नात्यांवर, जातीतल्या मतांवर किंवा दबावांवर चालणार असेल, तर गाव तिथंच थांबेल. पण जर सरपंच पद ही एक सामाजिक बांधिलकी समजून घेतली, तर तोच गाव उन्नतीकडे झेप घेईल."एक सरपंच गाव बदलू शकतो, पण केवळ तेव्हाच जेव्हा त्याचं ध्येय स्वतःचा झेंडा फडकवण्याचं नसून गावासाठी दिवा लावण्याचं असेल."
आज गावातल्या प्रत्येक सुज्ञ मतदाराने विचार करायला हवा की, आपण कोणाला आणि का निवडून देतो? निवडणूक म्हणजे आपलं भवितव्य ठरवणारा क्षण असतो, केवळ शेजारी किंवा नातेवाईक म्हणून कोणाला पुढे करणार असू, तर आपला विकास आपल्याच हातांनी गहाण ठेवत आहोत.एक जागृत गावकरी म्हणून विचार करायला हवा की *सरपंच पदासाठी लढणं प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर गावाच्या प्रगतीसाठी असावं.*
आज अनेक ठिकाणी राजकारण म्हणजे फक्त प्रतिष्ठेचा प्रश्न बनून बसलेला आहे. "माझा माणूस सरपंच झाला पाहिजे", "आपलं वर्चस्व टिकलं पाहिजे", "दोन दिवस गावभर बॅनर लावून नाव चमकवलं पाहिजे" एवढ्यावरच मर्यादित राजकीय आकांक्षा आहेत. हे पाहता, सरपंच पदाचा वापर विकासासाठी झाला पाहिजे की केवळ आत्मप्रौढीसाठी, हा प्रश्न अधिकच टोकदार होतो.अनेकदा गावात रस्ते असोत, पाणीपुरवठा असो, गटारी असोत किंवा गावकुस सुधारणा या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी निवडणूक म्हणजे फक्त मांडव, पोस्टर, जेवणावळी, आणि जातीय समीकरणं याच्यातच सारी शक्ती खर्च होते.
ज्यांना आपण ‘माझी माणसं’ म्हणून निवडून देतो, त्यांपैकी कितीजणांना खरंच ग्रामपंचायत कायद्याचं, निधी वितरणाचं किंवा ग्रामसभेचं स्वरूप माहिती असतं?
एका संशोधनानुसार, सुमारे ८० टक्के सरपंचांना ग्रामपंचायतीची मूलभूत माहितीही नसते. मग असे लोक गावाचा विकास नेमका कसा करणार?
सरपंच पदावर बसणं म्हणजे 'मी किती मोठा आहे' हे दाखवण्याची जागा नाही, तर 'गावात काय मोठं करायचं आहे' याचा विचार करण्याची जागा आहे.
ही संधी आहे:
१.नव्या पिढीला योग्य सुविधा मिळवून देण्याची.
२.पारदर्शक कारभार रुजवण्याची.
३.शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोचवण्याची.
४.गावात समाजिक सलोखा प्रस्थापित करण्याची.
यासाठी ज्यांना आपण उमेदवारी देतो, त्यांनी केवळ ‘सर्वसामान्य महिला’ म्हणून नव्हे, तर सुशिक्षित, समजूतदार, स्वप्न बाळगणाऱ्या महिला म्हणून समोर यावं, हीच खरी अपेक्षा.
गावचा कारभार हा नात्यांवर, जातीतल्या मतांवर किंवा दबावांवर चालणार असेल, तर गाव तिथंच थांबेल. पण जर सरपंच पद ही एक सामाजिक बांधिलकी समजून घेतली, तर तोच गाव उन्नतीकडे झेप घेईल."एक सरपंच गाव बदलू शकतो, पण केवळ तेव्हाच जेव्हा त्याचं ध्येय स्वतःचा झेंडा फडकवण्याचं नसून गावासाठी दिवा लावण्याचं असेल."
आज गावातल्या प्रत्येक सुज्ञ मतदाराने विचार करायला हवा की, आपण कोणाला आणि का निवडून देतो? निवडणूक म्हणजे आपलं भवितव्य ठरवणारा क्षण असतो, केवळ शेजारी किंवा नातेवाईक म्हणून कोणाला पुढे करणार असू, तर आपला विकास आपल्याच हातांनी गहाण ठेवत आहोत.एक जागृत गावकरी म्हणून विचार करायला हवा की *सरपंच पदासाठी लढणं प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर गावाच्या प्रगतीसाठी असावं.*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)