हे गणेशा, विघ्नहर्ता, गौरीपुत्रा!
दोन दिवसांपूर्वी तुझं आमच्या घरात आगमन झालं. तुला आम्ही प्रथम पूजतो, कारण तू साऱ्यांचा विघ्नहर्ता आहेस. जग तुझी ओळख करते विघ्नं हरवणारा म्हणून, पण आज मराठ्यांच्या मार्गातलं हे सर्वात मोठं विघ्न , अन्यायाचं, दगडासारख्या सत्ताधाऱ्यांच्या हृदयाचं , अजूनही तसंच आहे!
आज मराठा समाज मुंबईच्या दारात उभा आहे. संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो जीव आपल्या हक्कासाठी झगडत आहेत.न्यायासाठी पेटलेला हा महासागर, ही केवळ जमलेली माणसं नाहीत हे मराठ्यांच्या पराक्रमाची जिद्द, कित्येक वर्षाचा संयम याची साक्ष आहे! कितीतरी मोर्चे निघाले, कितीतरी अश्रू गळाले, आणि कितीतरी लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. घराघरात शोक आहे, आईंच्या कुशीतून लेकरं निघून गेली… तरीही सत्ताधाऱ्यांच्या मनात हलकाही बदल नाही!
मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमची लढाई न्यायासाठी आहे, अन्यायाच्या विरोधात आहे! कितीतरी आई बहिणी रडल्या, कित्येक घरं उध्वस्त झाली, तरुण लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. अजून किती किंमत मोजायची मराठ्यांनी ?
हे गणेशा,आम्ही तुझ्यासमोर साकडं घालतो. तू जगाचा विघ्नहर्ता आहेस, आज मराठ्यांच्या वाटेत आलेलं विघ्न दूर कर! झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना बुध्दी दे, त्यांच्या मेंदूत न्यायाचा प्रकाश टाक, कारण हक्क मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.
हे विघ्नहर्त्या, मराठ्यांच्या वाट्याला आलेलं हे सर्वात मोठं विघ्न दूर कर. न्यायाचा दिवा पेटू दे, आरक्षणाचा हक्क आम्हाला मिळू दे, जेणेकरून कोणत्याही आईच्या कुशीतून पुन्हा अश्रू गळू नयेत, कोणत्याही बापाच्या खांद्यावरून पुन्हा त्याच्या लेकराची प्रेत यात्रा निघू नये!
हे गणेशा, आमचं साकडं एकच , मराठ्यांचा विजय निश्चित कर! अन्याय संपव, न्याय दे, आणि मराठा समाजाच्या अश्रूंना हास्याचं रूप दे!आमचं स्वाभिमानाचं सूर्य पुन्हा उगवू दे!
हे गणेशा, तुझ्या आशीर्वादाशिवाय ही लढाई अपुरी राहील पण तुझ्या कृपेनं विजय निश्चित आहे!
दोन दिवसांपूर्वी तुझं आमच्या घरात आगमन झालं. तुला आम्ही प्रथम पूजतो, कारण तू साऱ्यांचा विघ्नहर्ता आहेस. जग तुझी ओळख करते विघ्नं हरवणारा म्हणून, पण आज मराठ्यांच्या मार्गातलं हे सर्वात मोठं विघ्न , अन्यायाचं, दगडासारख्या सत्ताधाऱ्यांच्या हृदयाचं , अजूनही तसंच आहे!
आज मराठा समाज मुंबईच्या दारात उभा आहे. संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो जीव आपल्या हक्कासाठी झगडत आहेत.न्यायासाठी पेटलेला हा महासागर, ही केवळ जमलेली माणसं नाहीत हे मराठ्यांच्या पराक्रमाची जिद्द, कित्येक वर्षाचा संयम याची साक्ष आहे! कितीतरी मोर्चे निघाले, कितीतरी अश्रू गळाले, आणि कितीतरी लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. घराघरात शोक आहे, आईंच्या कुशीतून लेकरं निघून गेली… तरीही सत्ताधाऱ्यांच्या मनात हलकाही बदल नाही!
मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमची लढाई न्यायासाठी आहे, अन्यायाच्या विरोधात आहे! कितीतरी आई बहिणी रडल्या, कित्येक घरं उध्वस्त झाली, तरुण लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. अजून किती किंमत मोजायची मराठ्यांनी ?
हे गणेशा,आम्ही तुझ्यासमोर साकडं घालतो. तू जगाचा विघ्नहर्ता आहेस, आज मराठ्यांच्या वाटेत आलेलं विघ्न दूर कर! झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना बुध्दी दे, त्यांच्या मेंदूत न्यायाचा प्रकाश टाक, कारण हक्क मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.
हे विघ्नहर्त्या, मराठ्यांच्या वाट्याला आलेलं हे सर्वात मोठं विघ्न दूर कर. न्यायाचा दिवा पेटू दे, आरक्षणाचा हक्क आम्हाला मिळू दे, जेणेकरून कोणत्याही आईच्या कुशीतून पुन्हा अश्रू गळू नयेत, कोणत्याही बापाच्या खांद्यावरून पुन्हा त्याच्या लेकराची प्रेत यात्रा निघू नये!
हे गणेशा, आमचं साकडं एकच , मराठ्यांचा विजय निश्चित कर! अन्याय संपव, न्याय दे, आणि मराठा समाजाच्या अश्रूंना हास्याचं रूप दे!आमचं स्वाभिमानाचं सूर्य पुन्हा उगवू दे!
हे गणेशा, तुझ्या आशीर्वादाशिवाय ही लढाई अपुरी राहील पण तुझ्या कृपेनं विजय निश्चित आहे!
© अक्षय पाटील , सोनवडे ता:शाहूवाडी, जि: कोल्हापूर
ब्लॉग: akshaypatil1800.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा