"माझ्या लेखणीतून...."


        पुरे झाले आता...या अन्यायाच्या रणांगणात आज मला माझ्या लेखणीला तलवारीची धार द्यायची आहे.गप्प बसणं आता शक्य नाही कारण बाकीची पिलावळ आता वळवळ करत सुटली आहे.या अन्यायाच्या रणांगणात मला लेखणीतून आवाज उठवायचा आहे आणि जो जो आमच्या मराठा समाजाच्या हक्कांच्या आड येईल, विरोध करेल, त्याची फक्त शब्दांनीचं आर-पार चिरफाड करायची आहे.           
             आम्हाला डोकं टेकवायला लावायचं स्वप्न पाहणाऱ्यांनो,कान उघडे ठेवा.मराठा कधीच झुकणार नाही! आमचा इतिहास ज्वालामुखीसारखा ज्वलंत असा आहे आणि आम्ही त्याचं ज्वालेतून जन्मलोय.आमचा संघर्ष आमच्या अभिमानासाठी ,स्वाभिमानासाठी आहे आणि जाणून बुजून जर कोण चुकीचं करत असेल,आमच्या लढ्याला बदनाम करत असेल,आमच्या अभिमानाला, स्वाभिमानाला डाग लावत असेल तर त्याची माय या लेखणीच्या प्रत्येक अक्षरात असेल हे लक्षात ठेवा.आमच्या हक्कांवर डाका घालणाऱ्यांची झोप आम्ही लेखणीच्या धारदार शब्दांनी उडवून टाकू.
       आम्ही शांततेत होतो,म्हणून तुम्ही उधळत आहात,पण आता आमची लेखणी पेटली आहे,शब्द लाल बुंद अंगार झाले आहेत आणि हा लेखणीचा विद्रोह थांबणार नाही जोपर्यंत मराठ्यांचा विजय होत नाही!.
       आज माझे शब्द केवळ लेखन करणार नाहीत तर आता लढणारही आहेत.🚩🚩
              ✍🏻 - अक्षय पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा